कालचक्र फिरते हवेत, की जमिनीवर?
फिरते तिथेच, की कापत असते अंतर?
अमृृृत निघेलही मंथनातुनी नंतर
पण विष पीणारा नाही येथे शंकर
संपूर्ण लक्ष वाटेवरील काट्यांवर
पाहताच आले नाही कुठले अंबर
राहते सलत एक चूक पुण्यात्म्याला
पडतात कमी पाप्यांना पापे शंभर
जेवढा व्यथांना मी समजावत जातो
त्रास तेवढा देत राहती वरचेवर
इतका कचरा ह्रदयात साठला माझ्या
हे होईल कधी देवा फक्त तुझे घर?
© भूषण कुलकर्णी