ऋतू

चालण्याची सवय जडली, थांबणे विसरून गेले
पोचता शिखरावरी काहीतरी हरवून गेले

वाद होता तो, तिथे संवाद नावालाच होता
काय जे बोलायचे, आधीच ते ठरवून गेले

आत जे आधीच होते, तेवढे संस्कार झाले
माहितीपुरतेच उरले, जे नवे शिकवून गेले

आठवण मधल्या ऋतूंची राहिली नाही जराही
तेच आठवतात जे फुलवून वा सुकवून गेले

© भूषण कुलकर्णी

Leave a comment