तू मला बोलावताना लक्ष नव्हते
दुःखही मग ऐकताना लक्ष नव्हते
लक्ष मुक्कामाकडे ठेवून होतो
वाट साधी चालताना लक्ष नव्हते
खटकल्या होत्या तुझ्या दोनेक गोष्टी
चांगले तू वागताना लक्ष नव्हते
जिंकल्यावर वेदना इतकीच आहे
घाव इतके लागताना लक्ष नव्हते
आज वारा बोलला कानात माझ्या
आजवर मी बोलताना लक्ष नव्हते?
© भूषण कुलकर्णी