सांजवेळी 

गदिमा म्हणायचे, प्रत्येक कलाकृतीची स्वत:ची कुंडली असते. या गझलेबद्दल मी हे अनुभवलं. वैभव जोशी सरांनी गीतलेखनाची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली होती. पहिल्या दिवसानंतर आमच्या निवडक वृत्तबद्ध कविता पाठवायला सांगितल्या होत्या. तेव्हा मी ही गझल पाठवली, सरांना खूप आवडली, आणि श्रेयस बेडेकर यांनी मला बक्षीस म्हणून लगेच चाल लावली. दुसऱ्या दिवशी ती ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता! एका रात्रीत मी गीतकार झालो होतो!!

वैभव सर म्हणाले होते, “एक गझल अशी आली की पुन्हा एकदा मला असं वाटून गेलं, अरे चुकली आपली बस, अपने को ये लिखना चाहिये था…”

ही दाद कायम प्रेरणा देत राहील मला आणखी चांगलं लिहिण्यासाठी!

श्रेयस सरांचे खूप आभार, मनात कायम राहील अशी चाल लावली आहे. संगीत संयोजक सत्यजित केळकर आणि सर्व वादकांचे खूप आभार. वैभव सरांमुळे हे सगळं शक्य झालं, त्यांना खूप खूप धन्यवाद!

हे गाणं नक्की ऐका:

Leave a comment