आ”पु.ल.”की

pl

पु. ल. देशपांडेंनी ‘आपुलकी’ या पुस्तकात विविध कलाक्षेत्रांतील काही मान्यवर व्यक्तींचे वर्णन केले आहे. त्यातील काही अंश:

१. हसून सोडून देण्यापलीकडे जगाचे काही महत्त्व नाही. गांभीर्य आणि विद्वत्ता यांचे नाते फार चुकीने जुळवले गेले आहे. कित्येकदा गांभीर्य ही स्वतःच्या विद्वत्तेविषयी साशंक असणार्या भयग्रस्त माणसाची ढाल असते. आपण विनोदी का नसावे?

२. पडता प्रपंच सावरणारा वडील भाऊ असावा आणि धाकटा कर्तबगार निघाल्यावर त्याच्या हाती सूत्रे सोपवून त्याचे कौतुक करत आणि त्याच्या हाती होणारी भरभराट पाहून त्याने धन्यता मानत रहावे, असा शुक्लांचा स्वभाव खरोखर हेवा करण्यासारखा आहे.

३. कलेच्या बाबतीत आत्मसंतुष्टता हा मोठा शाप आहे.

४. तू लोकसेवा का केलीस हे तुझं तुलाच कळलं नाही. तुझ्या आनंदासाठी तू केलंस, त्यांनी चांगलं व्हावं म्हणून नव्हे!

५. बाप आपली मुलगी सासरी जाणार हे ठाऊक असूनही तिला वाढवतो, शिकवतो, निरनिराळ्या कला शिकवतो, दागदागिने घालतो, आणि शेवटी दुसर्याच्या स्वाधीन करतोच ना!

६. सत्कार समरंभांचे हार गळ्यात पडले तरी नकळत पायात येऊन गुरफटतात आणि वाटचाल थांबवतात, हे त्यांनी पाहिलेले असल्यामुळेच सत्तेवरच्या उन्मत्तांना न भिणारे गोविंदराव त्या तसल्या हारांना भीत असावेत!

७. एक पाऊल टाकलं की दुसरं टाकायचं. एकूण किती पावलं होणार याचा हिशेब आधीच का मांडायचा? कीर्तनाला उभं राहिलं की उद्याच्या दिवसाची चिंता मिटते.

८. गांधीजींनी जीवनशिक्षणाच्या कल्पनेचा आग्रह धरला. जेपी नाईकांनी आपलं आयुष्य या कार्याला वाहिलं.

९. विद्वत्ता हे स्मरणशक्तीचे प्रयोग नव्हे. विद्वत्ता हे जीवनातले साध्य नसून साधन आहे.

१०. त्याने गरिबी भोगली, पण दैन्याला मनात प्रवेश करू दिला नाही. म्हणून पुण्यातल्या त्या अद्भुत चाळीतल्या एका खोलीतल्या संसारात वसंता खाटेवर असा ऐटीत बसायचा की त्या खाटेचे तख्त होऊन जायचे.

११. एका विलक्षण तळमळीने एखाद्या विषयात शिरणे हा त्याच्या पिंडाचाच धर्म होता. निष्काळजीपणाने काही करणे त्याला जमतच नव्हते.

१२. बालगंधर्वांचे गाणे ऐकत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत आलेली आहे, ती म्हणजे ते फक्त गायला बसत. यापलीकडे काही सिद्ध करायला बसत नसत.

१३. वर्तमानाकडे संपूर्णपणाने दुर्लक्ष करून भूतकाळातल्या घटनांची नोंद करत राहणे म्हणजेच काही इतिहाससंशोधन नव्हे.

१४. ‘किमया’ हे माधवच्या पुस्तकाचेच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाचेच नाव वाटते. त्याचे डोळे भोवतालचा निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलासृष्टीकडे सदैव उत्सुकतेने पाहायचे. माधवच्या बोलण्यात कधी सैलपणा नसे. साधे बोलणेही उत्कट. त्याच्या जोडीला अत्यंत तल्लख विनोदबुद्धी. त्यामुळे त्याच्या पांडित्याचा डोह झाला नाही. ते प्रवाही होते, आल्हाददायक होते.

© भूषण कुलकर्णी

जीवनझरा

IMG_20170525_155040

मेघ वर्षले, धरणीवर अवतरले
छोटे जलप्रवाह, एकत्र मिसळले
आता सर्व सोबत वाहणे, हेच जीवनगाणे!

मऊमऊ माती, सोबत येती
काही दगड, उगाच खुपती
तेही होतील मऊ कालांतराने, हेच जीवनगाणे!

कोणी गुणगान गाती, काव्यसुमने उधळती
कोणी पाहत राहती, कोणी वाट अडवती
तरी खळखळून हसत वाहणे, हेच जीवनगाणे!

इवलीशी रोपे, कुशीत फुलती
काही फुले, काही काटे देती
सर्वांना प्रेम देत राहणे, हेच जीवनगाणे!

तो विशाल सागर, माझे ध्येय थोर
पोहोचेन तिथवर, वा सुकेन वाटेवर
तरी पुढे जात राहणे, हेच जीवनगाणे!

© भूषण कुलकर्णी

अँधेरा

खुद से उम्मीदें कुछ ज्यादा बडी थी,
ख्वाब और हकीकत, दूरियाँ बढी थी।
शायद सब कुछ नष्ट हुआ है,
लेकिन हाँ, जिंदा हूँ, यही बहुत है।

गम की गलियों मे पहली बार चल रहा हूँ,
भरी महफिल मे अकेला पहली बार हुआ हूँ।
सब तरफ अँधेरा, एक दीपक की प्रतीक्षा है,
वह बाहर मिलेगा, या अंदर, यही सवाल है।

मन का दीपक प्रकाश नही देता है,
या बाहरी जगमगाहट से धुंधला हुआ है?
हर दीपक को अलग समझना होगा,
अपना दीपक बुझाकर क्या लाभ होगा?

घर पे बात करने का दिल नही करता,
सच्चा दोस्त कौन, समझ नही आता।
अपनों को शायद खुशियाँ नही दे सकूंगा,
पर उन्हें गम का सदमा तो नही दूंगा।

जिंदगी के इस पडाव मे,
खुद को संभालता हूँ।
यह समय भी गुजर जाएगा,
इसी उम्मीद मे जी लेता हूँ।

(Concerning about suicide incidents happened during last semester at IITKGP, this poem thinks from the point of view of a depressed student.)

© भूषण कुलकर्णी

ठहराव

आज ढलते ढलते सूरज थम सा गया है,
अपने कोमल किरणों से कुछ कह रहा है।

“कई दिनों से तुम्हें व्यस्त देखता हूँ,
तुम्हें समय मिलेगा, इसकी प्रतीक्षा करता हूँ।

आज वक्त है, हो जाए दीदार-ए-नजर,
कुछ पल मै भी ठहरुँ, तु भी ठहर।

लौटते पंछियों के मीठे सुरों की दाद दे,
इन पेड-पौधों की सुन्दरता निहार ले।

कुछ पल तो टहलना इनकी गलियों मे,
सुगंधित पुष्प लिये खडे है इंतजार मे।

जिन रास्तों पे चलता है अपनी ही धुन मे,
प्यार भरी निगाहों से उन्हें भी देख ले।

साइकिल के चक्कों को अब गती दे,
इन हवाओं से भी कुछ बात कर ले।

दिन के आखिरी पल आराम से गुजारना,
नया दिन, नयी जगह, नए से शुरु करना।

तुम जहां भी रहो, याद रखना एक बात,
हम तुम्हारे मित्र हैं, सदा रहेंगे साथ।”

© भूषण कुलकर्णी

During the last semester at IIT Kharagpur, I had several photo-sessions. This is photo-shoot with my special friends…

18

113

5121479

घोटभर

nana2

चिंतांचे काहूर
विचारांचा पूर
प्रश्न अपार
एकच उत्तर
घ्यावी घोटभर!

काॅलेजचे आवार
बाराचा सुमार
वाढदिवसाचा वार
आता कशाचा उशीर
घ्यावी घोटभर!

जमला मित्रपरिवार
खूप दिवसांनंतर
गप्पा, गीतांचे सुर
जुन्याच कट्ट्यावर
घ्यावी घोटभर!

मन सैरभैर
आठवणी फार
विरह तीव्र
तिच्या फोटोसमोर
घ्यावी घोटभर!

एकटाच गच्चीवर
शांत रात्रप्रहर
पौर्णिमेचा चंद्र
चला जाऊ चंद्रावर
घ्यावी घोटभर!

© भूषण कुलकर्णी

(संकल्पना: गोपीनाथ लंगोटे)

अथांग

IMG-20161224-WA0004

हे सागरा! किती शांत गंभीर दिसशी
खोल त्या डोहामध्ये काय बरे लपवशी?
सर्व आघात सोसूनही मर्यादा पाळिसी
साक्षात् भीष्म पितामह शोभसी!

अथांग तू, अपार तू, अनंत जलराशी
ध्यानस्थ योगी जणू, तेजस्वी दिसशी
कधी सुमधुर हास्य तर कधी तांडव करिसी
नटराज रूद्र महादेव दिसशी!

दिवसभर तापून जलचक्र चालविसी
मोती शिंपले रत्ने भरभरून देसी
परि मधुर जलवाणीत मीठ मिसळसी
कधी तू सक्षम पिताच भासशी!

कित्येक जीवांना उदरात धारिसी
त्यांचे निष्ठेने रक्षण करिसी
जलरूप मायेचा पदर ओढिसी
तू वात्सल्यपूर्ण आईच दिसशी!

तुज पाहता फिटे डोळ्यांचे पारणे
उजळून येई मनातील चांदणे
हळुवार लाटांशी हितगुज करणे
तुझे मित्ररुप सर्वथा आवडे!

© भूषण कुलकर्णी

स्मृतिचित्र

IMG_20170408_180758.jpg

कुछ दिन बीते पलों में,
कुछ पल बीते दिनों में।

कुछ रातें शांत अकेली,
तो कुछ उत्सव मनाती।

इन दिनों बहुत कुछ सीखा,
विविध अनुभव-भूषित हुआ।

मीठी बातें, मुस्कराते चेहरे,
कुछ अपने, कुछ पराये।

कुछ अध्यापक चाव से पढाते,
तो कुछ हमें रास न आते।

मित्रों की महफिलें सजी,
जीवनभर की यादें बनी।

बंगाल की यह मीठी वाणी,
‘भालो’ के बाद पूरी अनजानी।

यहाँ के लोग, पेड, बरसात,
खडगपुर की निराली है बात!

इन यादों के गीत गुनगुनाता रहुंगा,
अभी चलता हूँ दोस्तों, मिलता रहुंगा।

© भूषण कुलकर्णी

कुठे निमाले काव्य तुझे?

pen

चिंतेच्या ढिगार्यात
भयाच्या अंधारात
अनिश्चिततेच्या सावटात
वासनेच्या वादळात
का हरवले काव्य तुझे?

ते निर्मळ मन
भावनिक आत्मकथन
माणुसकीचे दोन क्षण
रम्य निसर्ग भ्रमण
यांसह गेले काव्य तुझे?

काव्य हे जीवन
साक्षात आनंदवन
माणसाचे माणूसपण
कालचक्राचे वंगण
समजून घे काव्य तुझे!

निर्मळ मनात
प्रेमळ बंधनात
दैनिक जीवनात
वा सुखस्वप्नात
पुन्हा प्रकटेल काव्य तुझे!

© भूषण कुलकर्णी

चिऊ-आई

sparrow2

पिले दाणे टिपावया, दूरदेशी गेली
अद्याप न परतली, झाली पापणी ओली…

तिकडची हवा, तिकडचं पाणी
का मनात भरलं, तिकडचं कोणी!

फळे रसाळी, स्वच्छंद गाणी
गेली असतील, पिले रमूनी!

ते सुंदर वन, त्यांना भावले
का कोणी सोनेरी, पिंजर्यात कोंडले?

पिंजराही कदाचित, आवडला असेल
जिथे आरामात, सर्वकाही मिळेल!

हे ईश्वरा, तुजला एवढीच प्रार्थना
इवल्याश्या पंखांवर, विश्वास दे त्यांना

माझी थोडी आठवण, रहावी मनांत
त्यांनी कुठेही रहावे, असावे निवांत…

(This poem thinks from the point of view of a mother whose children are in foreign country, taking analogy of mother-sparrow)

© भूषण कुलकर्णी

स्थित्यंतर

img_20170121_063052

आज यशोशिखरावरही
मन का अशांत आहे
गतकालाच्या आठवणींत
पुन्हा का रमत आहे

पुरान्याच गीतपंक्ती
पुन्हा का गुणगुणत आहे
गणिती अभ्यासातही
भावना का शोधत आहे

संगणकाच्या पडद्यावरही
बालपण का चितारीत आहे
गल्ली—क्रिकेट पाहताना
क्षणभर का थबकत आहे

शेकडो कल्पनांमध्ये
एक ध्येय शोधत आहे
पुढच्याच क्षणाला
पुन्हा का बहकत आहे

धावताना राहिलेले
क्षण पुन्हा जगत आहे
आज पहिल्यानेच
भावना काव्यात मांडत आहे

© भूषण कुलकर्णी