खूप दिवसांनी अता ओळी नव्या सुचतील का?
पानगळ झाली, पुन्हा पाने नवी फुटतील का?
रोज भ्रमरांना बघितले चुंबितेवेळी फुले
मग अता ह्रदये कळ्यांची कोवळी उरतील का?
वेगळ्या वाटेस गेलो, वेगळे झालो तरी
वेदना आपापल्या या आपल्या असतील का?
वाटण्याआधी कुतूहल मारले जाते इथे
शिक्षणाआधीच म्हणती, नोकर्या मिळतील का?
शुद्ध माझ्या भावना असल्या तरी भय वाटते
बोलताना शब्द काही वावगे ठरतील का?
© भूषण कुलकर्णी